भातकुडगांव
शेवगांव तालुक्यातील भातकुडगांव परिसरात मोठ्या प्रमाणात गळतीसाठी उस उभा आहे. साखर कारखाना प्रशासनाने उस तोडणी मजूरांची संख्या वाढवून उसाचे गळीत लवकरात लवकर करण्यात यावे. अशी मागणी शेतकरी वर्गातून जोर धरत आहे. उन्हाच्या तीव्रतेने उसाच्या खोडक्या होण्याची भिती शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.
शेवगाव तालुक्यातील भातकुडगांव, भायगाव, बक्तरपूर, मजलेशहर, शहरटाकळी, देवटाकळी, हिंगणगांव, जोहरापूर ही गावे गंगामाई, केदारेश्वर, ज्ञानेश्वर, वृध्देश्वर कारखान्याचे कार्यक्षेत्र आहे. हे सर्व कारखाने उस लागवड नोंदी घेतांना आमचे कार्यक्षेत्र आहे असा हक्क दाखवून नोंदी घेतल्या जातात. मात्र उस गळीतावेळी या गटाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते.
कार्यक्षेत्रातील उसाला गळीतास प्राधान्य देण्याएैवजी बाहेरील उस आणण्यात कारखाना प्रशासन धन्यता मानतात. या गटामध्ये उस तोडणी मजूराची संख्या अत्यंत कमी प्रमाणात असल्यामुळे आँक्टोबर मधील नोंद असणा-या उस गळीतास चालू आहे. त्यानंतर ही मोठ्या प्रमाणात नोंदी असल्याने उस गळीतास जातो की नाही अशी भिती शेतकरी वर्गातून व्यक्त केली जात आहे.
दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत असल्याने उस तोडणी मजूर किती दिवस थांबतात. जर हे मजूर गावाकडे निघून गेल्यास उस गळीताचा मोठा प्रश्न निर्माण होवू शकतो. त्यामुळे साखर कारखाना प्रशासनाने तातडीने उस तोडणी मजूराची संख्या वाढवून कार्यक्षेत्रातील उस गळीतास प्राधान्य द्यावे. तरच आपला हक्क या कार्यक्षेत्रावर सांगावा. अशा संतप्त प्रतिक्रिया या भागातील शेतकऱ्यांमधून उमटत आहेत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपली कमेंट याठिकाणी लिहा...